मैंने उसको

मैंने उसको
जब-जब देखा
लोहा देखा

लोहे जैसा
तपते देखा
गलते देखा
ढलते देखा

मैंने उसको
गोली जैसा
चलते देखा!

( केदारनाथ अग्रवाल )

…चुकली दिशा तरीही


चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

– विंदा करंदीकर

Sahir Saga

Sahir Ludhianvi

Abdul Hayee (8 March 1921 – 25 October 1980), popularly known by his takhallus (pen name) Sahir Ludhianvi, was an Indian poet and film songs lyricist who wrote in the Hindi and Urdu languages. 

His work influenced Indian cinema, in particular Bollywood film. Sahir won a Filmfare Award for Best Lyricist for Taj Mahal (1963). He won a second Filmfare Award for Best Lyricist for his work on Kabhie Kabhie (1976). He was awarded the Padma Shri in 1971. On 8 March 2013, the ninety-second anniversary of Sahir’s birth, a commemorative stamp was issued in his honour. Sahir wrote,

पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है

मुझसे पहले कितने शायर, आए और आकर चले गए,

कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नग़मे गाकर चले गए

वो भी एक पल का किस्सा थे, मै भी एक पल का किस्सा हूँ

कल तुमसे जुदा हो जाऊँगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूँ”

Sahir was different from his contemporaries in that he did not praise Khuda (God), Husn (beauty) or Jaam (wine). Instead, he wrote bitter yet sensitive lyrics about the declining values of society; the senselessness of war and politics; and the domination of consumerism over love. His love songs, tinged with sorrow, expressed his realisation that there were other, starker concepts more important than love. Sahir might be called the “bard for the underdog”. Close to his heart were the farmer crushed by debt, the soldier gone to fight someone else’s war, the woman forced to sell her body, the youth frustrated by unemployment and the family living on the street for instance. Jawaharlal Nehru, Prime Minister of India said he was moved by Sahir’s lyrics in Pyaasa.[citation needed] Vijay, as he is passing through a red light area sings, 

“ये कूचे, ये नीलामघर दिलकशी के,

ये लुटते हुए कारवां ज़िंदगी के,

कहाँ है कहाँ है मुहाफ़िज़ खुदी के?

जिन्हें नाज़ है हिंद पर,वो कहाँ हैं?”

Sahir’s poetry was influenced by noted Pakistani poet, Faiz Ahmed Faiz. Like Faiz, Sahir gave Urdu poetry an intellectual element that caught the imagination of the youth of the 1940s, 1950s and 1960s and reflected the feelings of the people of that period. He roused people from an independence-induced smugness. He would pick on the self-appointed custodian of religion, the self-serving politician, the exploitative capitalist, and the war-mongering super-powers. Sahir wrote with verve about the arrest of progressive writers in Pakistan; the launch of the satellite Sputnik and the discovery of Ghalib by a government lusting after minority votes. He wrote Kahat-e-Bangal (The Famine of Bengal) at 25 years of age. Subah-e-Navroz (Dawn of a New Day), mocks the way people celebrate while the poor exist in squalor. Of the Taj mahal, he wrote, 

“मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे,

बज़्म- ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या माने.

सबत जिन राहों पर है सतबते शाही के निशां

उसपे उल्फत भरी रूहों का गुज़र क्या माने?”-

Sahir Ludhianvi asks his lover to meet him anywhere else but at the Taj Mahal: although the tomb has been a symbol of luxurious monarchy for years, there is no need for beautiful (but not famous) hearts to travel to meet there.

Sahir Ludhianvi recited this poetry couplet at his college event, when he was barely 19 years old, and created an uproar in the literary circles:

Ek Shahensha Ne Daulat Ka Sahara Lekar, 

Hum Gharibon Ki Mohabbat Ka Udaya Hai Mazaq 

Of his legacy, Sahir writes, 

“कल और आयेंगे नगमो की खिलती कलियाँ चुनने वाले,

मुझसे बेहतर कहनेवाले,

तुमसे बेहतर सुननेवाले;

कल कोई उनको याद करे,

क्यूँ कोई मुझको याद करे?

मसरूफ ज़माना मेरे लिए क्यूँ

वक़्त अपना बर्बाद करे?”

“Tomorrow there will be more who will narrate the love poems. May be someone narrating better than me. May be someone listening better than you. Why should anyone remember me? Why should anyone remember me?

Why should the busy age waste its time for me?”

Courtesy: Kavishala

ती गेली तेव्हा…

FB_IMG_1526366563429-01ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती गेली तेव्हा रिमझिम ..पाऊस निनादत होता..

मेघात अडकली किरणे ..हा सूर्य सोडवीत होता..

ती आई होती म्हणुनी… घनव्याकुळ मीही रडलो ..

त्यावेळी वारा सावध ..पाचोळा उडवित होता ..

अंगणात गमले मजला ..संपले बालपण माझे.

खिडकीवर धुरकट तेव्हा ..कंदील एकटा होता …

(गाण्यात न घेतलेली दोन कडवी अशी आहेत)

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |

– कवी ग्रेस

हे गाणं कितिदाही ऐकलं तरी मन भरत नाही. कवी ग्रेस यांचा ओळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी चलबद्ध आणि गायील्या आहेत. या गाण्यात असं काही आहे की ते अजूनहि तितकच ताजेतवाने आणि ह्रदयला भिडणार आहे.

 

या गाण्याचे विश्लेषण करणारा एक सुंदर ब्लॉग वाचला. यात श्री संजय क्षीरसागर यांनी खूप छान अर्थ समजवून सांगितला आहे. तोच इथे कॉपी पेस्ट करत आहे.

या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची. त्यावेळी होत असलेली मनाची असह्य अवस्था ग्रेस या कवितेत अत्यंत कलात्मकरित्या मांडतो.

एक स्त्री की जी मैत्रिणीच्या वयाची, (त्यात) स्वत:चा प्रियकर असलेली आणि तरीही (स्वत:शी) आईचं नातं जडलेली!

अत्यंत जीवघेणी असह्यता, आणि तरीही सहज पार करता येईल असं दु:ख पण नात्याच्या मर्यादा, अशी बेहद्द गुंतागुंतीची स्थिती.

सामान्य व्यक्तीच्या जीवनात असं दु:ख असंभव, तरीही ‘दु:ख’ ही भावना सगळ्यांना समान (मग कारण काहीही असो). असाह्यता केवळ बेजोड, पण ‘आपल्यासाठी केवळ कल्पना’ म्हणून, (किमान संवेदनाशिल व्यक्ती) तरी ती बेदखल करु शकत नाही. आणि समजा कुणी केली, तर मग कविता कशी समजणार ?

तर असा हा अप्रतिम काव्यविषय आणि ग्रेससारख्या चिंतनशील, सौंदर्यवादी आणि प्रतिभावंत कवीची रचना, केवळ लाजवाब!
____________________________________

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

नादमय शब्दयोजना कशी असावी आणि तीही प्रचलित मराठीसारख्या (ज्ञानेश्वरांच्या नाही), नाद-दुर्लभ भाषेत, याचा प्रत्यय देणारं शब्दसंयोजन ‘पाऊस निनादत होता’ !
आणि त्यापूर्वी येणारा तो शब्द, ‘रिमझिम’ !
आणि तो शब्द जिच्याशी जोडलायं ती कमालीची लक्षवेधी ओळ ‘ती गेली तेव्हा’ !

पहिल्या ओळीतच नादमय शब्दसंयोजन, लयीचा अत्यंत नाजूक हेलकावा आणि सर्वांचा मिळून एक चित्रदर्शी परिणाम :

‘ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता’!

रसिकमनाला खेचून घेईल अशी सुरुवात.

आणि लगेच तिच्या (ओलसर) केशकुंतलांची मेघांशी केलेली रुपकात्मक सरमिसळ! जस्ट मॅडनेस!

‘मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता’

त्यावर कहर म्हणजे (ती प्रियकराकडे निघाल्यानं) स्वत:च्या मनाची झालेली गुंतागुंत सोडवायचा अत्यंत लाघवी प्रयत्न… ‘हा सूर्य सोडवित होता’ !

काय कमाल प्रतिभा आहे या माणसाची, निव्वळ थक्क होऊन जावं!

______________________________________________

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

मग पुन्हा मनाचा कोंडमारा आणि काय लाजवाब अभिव्यक्ती, ‘ घनव्याकुळ मीही रडलो’. कसे सुचत असावेत शब्द या प्रतिभावंताला? ‘घनव्याकुळ’.
स्वत:चा शब्द तरीही अर्थाशी ईमान, काव्यविषयाशी एकसंधता आणि पावसाच्या माहौलशी एकरुपता!

एका शब्दात सगळा परिणाम एकवटण्याची किमया, रसिकाला स्वत:च्या प्रगल्भ अनुभवाच्या खोलीशी नेण्याची ताकत.

आणि दुसर्‍या ओळीत सामाजिक उपहासाचं किती नाजूक भान,

‘त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता’

कवीच्या दु:खाशी जे समरुप होऊ शकत नाहीत अशा सावध (खरं तर असंवेदनाशील) लोकांना, असे विचार म्हणजे केवळ पाचोळा!

______________________________________

पुन्हा एकवार तीच जीवाची घालमेल, पण मांडणीची बेतहाशा नज़ाकत :

‘अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे’
आता ती आई राहिली नाही त्यामुळे बालपण संपलं. घरापासून अंगण दूर झालं!

‘खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता’

आता या आयुष्याच्या बद्ध चौकटीत (मिणमिणत्या) कंदीलासारखी एकाकी अवस्था!

__________________________________

स्वत:च्या आणि आईच्या वयातलं अंतर, मोहाचा भुलावा आणि नात्याचा तोल, ग्रेस काय बहारीनं जपतोयं. एकदा असं ही वाटून गेलं की बंध पार करावा :

‘तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती’

…. पण अचानक :

‘शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता’

नातं ही केवळ मान्यता आहे हे कुणाही प्रगल्भ विचारसरणीच्या व्यक्तीला कळतं, पण तो अर्थबोध जरी शब्दातून वगळला तरी उरलेल्या शब्दातून पुन्हा अर्थ उगवतोच!

शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता’

काय कमालीची संयत मांडणी आहे.
____________________________

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही

आता मी असाच मोठा होईन आणि कोरडाच वाढत राहीन. आईपासून (त्या गहिर्‍या नात्यापासून) तुटण्याचं दु:ख आता असं काही गोठलंय की पुन्हा गहिंवर यावा असं काही घडणार नाही.

काय कमालीचं वर्णन आहे व्याकुळतेचं ‘मज आता गहिंवर नाही’

आणि शेवटच्या ओळी तर काय कहर आहेत!

‘वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता’

म्हणजे ज्या आईची सामाजानं अवहेलना करु नये, तिची लज्जा झाकली जावी म्हणून मी कृष्ण झालो, तिला सर्वतोपरी झाकायचा प्रयत्न केला (ते नातं सावरतांना आता अशी काही असहायता आलीये की) मीच… सर्वस्वी निर्वस्त्र झालो.

https://www.misalpav.com/node/29066

सुगरण

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाले टांगला

पिल्लं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

सुगरीण सुगरीण
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगती मिये
गण्या गंप्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं

*बहिणाबाई